आपलं सहर्ष स्वागत करित आहे.

माऊलीधाम

फोटो आणि माहिती.

मुखपृष्ठ

प्रस्तावना :

      राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्थेची स्थापना १९८९ साली झाली.
      समाजातील अनेक जात समूहापैकी यलम ही एक जात आहे.यलम ही जात महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर पसरलेल्या मराठवाड्यात विशेषत:लातूर जिल्हा व आसपासच्या परिसरात यलम जात आढळणे या जातीची लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात 4 लाखापेक्षा जास्त अहेत. आंध्रप्रदेश व कर्नाटक सीमावर्ती भागात यलम,समाज आहे तेथील समाज यलम रेड्डी ही उपाधी लावतात त्यामुळे या जातसमूहाला रेड्डी नावाने (जातीने) ही ओळखले जाते.
यलम समाजाच्या उपसंस्था मुंबई,औरंगाबाद,नगर,आळंदी,पंढरपूर यथे आहेत.

यलम समाज :

      यलम ही जात आंध्रप्रदेशातून स्थलांतरीत झालेली शेतकऱ्यांची जमात आहे.वेली या तेलगु शब्दाचा अर्थ शेती असा व वेलमा म्हणजे शेतकरी. वेलमा - येलमा - यलम असा शाब्दिक अपभ्रश होऊन यलम हा शब्द तयार झाला.हि जात शुद्र वर्गात गणली जात असे हि जमात महाराष्ट्रात मराठवाडा विभागात विशेषत: दक्षिण मराठवाड्यात दिसते आंध्रप्रदेशातून शेती व्यवसाय करण्यासाठी स्थलांतरीत होवून महाराष्ट्रातील मराठवाड्यात स्थायिक झाली.यलम समाजाच्या साडेसात उपजाती मानल्या जातात त्यात पाकनाटे गोमाले,गुरुडी,चीटपले,गोलावर,मोटाडे,पिचकुटले,या उपजाती आहेत.

यलम समाजाचे वास्तव्य :

       मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद,या जिल्हयात एकून समाजाच्या 80 % पेक्षा जास्ती लोक येथे वास्तव्य करतात त्याच बरोबर बार्शी, श्रीरामपूर, गंगाखेड, पंढरपूर, येथेही काही गावात तुरळक वस्ती आहेत.तसेंच मुंबई, औरंगाबाद, पुणे, ठाणे येथे नोकरी व्यावसायानिम्मित स्थायिक लोक आहेत. जगातील काही देशामध्ये ही अल्पप्रमाणात यलम समाजातील तरुण वर्ग नोकरी व्यवसायानिम्मित स्थायिक होऊ लागला अहे.

यलम समाजाचे सामाजिक जीवन :

      महाराष्ट्रातील यलम समाजाचे सामाजिक जीवन इतर समाजातील जातीशी मिळत जुळते असून स्वजाती व इतर जातीशी एकोप्याने व प्रेमाने राहणारा समाज आहे.या जातीत उच्च प्रकार नसून सर्वांचे सामाजिक जीवन सारखेच आहे.

यलम समाजाचे धार्मिक जीवन :

      यलम समाज हा पूर्णपणे हिंदू धर्म व त्याचे रीतीरिवाज पाहणारा आहे. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथ शास्त्र पुराणावर श्रध्दा ठेवून आचरण करणारा समाज आहे.यलम समाज हा वारकरी संप्रदायला मानणारा असल्यामुळे बहुतेकांचे कुलदैवत पंढरपूरचा पांडुरंग हेच आहे. आषाढी,कार्तिकी एकादशीला दिंडी सोबत अनेक समाज बांधव जाताना दिसतात त्याच बरोबर नरसिह,विठोबा,खंडोबा,ज्योतिबा,मशाम्मा,पोचम्मा,खोकलेम्मा इ.हि कुलदैवत आहेत .

संस्थेचा उद्देश :

      १) समाजात शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक, नैतिक, ओद्योगिक, शीक्षणाचा प्रसार करणे, शिक्षण देणे.
      २) समाजाची सर्वांगीण उन्नती करणे. पूर्ण वाचा.

सभासदत्वासांठी नियम :

      सभासद हा त्या त्या विभागातील कायम रहिवाशी असला पाहिजे. व त्याने तो रहिवाशी असलेल्या विभागतच सभासद नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच एका विभागामधून संस्थेचे सभासदत्व मिळविल्यानंतर अन्य ठिकाणी सभासदत्वासाठी नोंदणी अर्ज करता येणार नाही.व असे सभासदत्व कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.

      वयाच्या 18 वर्षावरील येलम / रेड्डी समाजातील कोणत्याही व्यक्तीस रुपये ५००० /- (रुपये पाच हजार कातर ) भरून सभासदत्वासाठी संस्थेच्या कार्याकारीनिकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.पंढरपूर व औरंगाबाद विभागातील सभासद अर्ज तेथील उपसमितीच्या शिफारशीसह मुख्य कार्याकारीनिकडे पाठविण्यात येतील.सर्व सभासदांच्या अर्जावर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारिणीला असेल.

      सन्माननीय सभासदत्व - समाजातील मान्यवर व्यक्तीस असे सभासदत्व देता येईल पण त्यांना मतदान करता येणार नाही . कार्यकारी मंडळासाठी निवडणूक लढविता येणार नाही. परंतू सन्माननीय सभासदांनी दिलेला सल्ला कार्यकारिणी विचारात घेवू शकते .

संस्थेबद्दल :

       एखादा विश्र्वस्त किंवा पदाधिकारी याने विश्र्वस्त पदाचा राजीनामा दिल्यास,काही कारणाने महाराष्ट्र राज्य सोडून इतरत्र वास्तव्यात गेल्यास,किंवा परदेशी वास्तव्य करण्यास गेल्यास,किंवा दिवंगत झाल्यास किंवा फौजदारी गुन्हाच आरोप शबीत झाल्यास,किंवा संस्थेच्या हिताविरुध्द त्याने वर्तन केल्यास त्याचे विश्र्वस्त पद रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील व त्या रिक्त होणा-या जागेवर नवीन विश्र्वस्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.
पूर्ण वाचा.



                                   

                                          यलम रेड्डी वधू वर सूचक केंद्र.(नोंदणी करा...)

आमचे कार्यक्रम


      वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते.
      वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात. श्रोत्यांच्या मनांत भक्तिरसाचा परिपोष करणे, तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे महत्त्वाचे हेतू आहेत.
      प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच,
तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले. संत ⇨ नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर, आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते.

      आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो.
      वारीचे दोन प्रकार आहेत:
      आषाढी वारी.
      कार्तिकी वारी.

आषाढी वारी

      आषाढी एकादशी म्हणजे वर्षाच्या सणांची खरी सुरुवात.हि वारकरी संप्रदायाची सर्वात महत्वाची वारी असुन सर्व संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरात आपापल्या गावाहून येतात.
      आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात.

कार्तिकी वारी

      कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
      राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्थेतर्फ़ॆ आषाढी आणि कार्तिकी एकादशीस वारकरी मंडळी आळंदी हून पंढरपूर ला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.या दिंडीत सुमारे २००० ते ३००० वारकरी मंडळी सहभागी होतात.हि दोन दिवसाची यात्रा पूर्ण झाल्यावर गावी परत जाताना जागोजागी मुक्काम करुन नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडाचे कार्यक्रम करुन हरिजागर करीत असतात. पालखी सोहळयातील विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, घोडेस्वार इत्यादि बाबतींतली संपूर्ण व्यवस्था संस्थानच्या मार्गदर्शनाखाली पाहिली जाते.संस्थेतर्फ़ॆ फराळाचा कार्यक्रम हि ठेवलेला असतो.आणि एकादशीस बारस सोडण्यासाठी जेवणाचाही उपक्रम आमच्या संस्थेने राबवलेला आहे.मुक्काम संत नामदेव शाळा येथे केला जातो.

वेळ अमावस्या

      कृषी संस्कृतीचा आदर्श ‘वेळ अमावस्या’.
      काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या पवित्र भावनं कर्नाटक आणि लगतच्या मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत दर्श अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.कर्नाटक प्रांतात व लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड या जिल्ह्य़ांतील काही तालुक्यांत वेळअमावस्या हा महत्त्वाचा वार्षकि सण साजरा केला जातो.मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे नागरकरण हे 'वेळ अमावस्या' झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या असते.
      लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत वेळ अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात पांडवाची पूजा, तसेच काळ्या मातीची यथासांग पूजा करीत असतो. या दिवशी सर्वभाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी, ताकाचे अंबिल आणि ज्वारीचे उंडे हे खास ग्रामीण पदार्थ नैवेद्यासाठी असतात. गोड पदार्थ म्हणून गव्हाची खीर असते आणि तेच जेवण सर्वांना देण्यात येते.

                                                                                   वेळ अमावस्या दिवशी पूजा करताना.

कार्यकारी मंडळ


अध्यक्ष

मा. भगवान पेद्दावाड
मो.नंबर- ९४२२०२९५६७

उपाध्यक्ष

अ‍ॅड. माधवराव नरहरे
मो.नंबर- ९९२२४३७५०९

मा. ओमप्रकाश पेटे
मो.नंबर- ९३२५१३५५९९

सहसचिव

मा. बालाजी मिरकले
मो.नंबर- ८८८८२२८१८१

खजिनदार

मा. वामनराव मुसने
मो.नंबर- ९८२२८४०३५५

कार्याध्यक्ष

डॉ. व्यंकटेश वांगवाड
मो.नंबर- ९८६०२३६३५२

सचिव

डॉ. पंडित शेळके
मो. नंबर- ९८५०१७६५७५

सदस्य

मा.हरिभाऊ मरे
मो. नंबर- ८८०६६६४०१५

मा .गोपाळ कासले
मो. नंबर- ९८२२३३५४९३

मा.वसंतराव शिंगडे
मो.नंबर- ९४२३५३१३२०

मा.काका कोल्हे
मो. नंबर- ९८२२४३५६६७


कार्यकारि मंडऴ नेमण्याची पध्दत :

      संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड हि दर ५ वर्षांनी संस्थेच्या आळंदी येथील धर्मशाळेमध्ये होणा-या सर्व साधरण सभेमध्ये करण्यात येईल .

कार्यकारी मंडळाबद्दल माहिती :

      अ) संस्थेच्या कार्यकारी मंडळात १५ विश्र्वस्त राहतील. त्यापैकी १० विश्र्वस्त हे पुणे मुख्य विभागातील (पुणे, मुंबई,नाशिक,अहमदनगर या जिल्ह्यातून)असतील. तसेच पंढरपूर विभागातून (लातूर,सोलापूर,उस्मानाबाद या जिल्ह्यातून) ३ विश्र्वस्त राहतील. तसेच औरंगाबाद विभागातून (औरंगाबाद,बीड,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड या जिल्ह्यातून) २ विश्र्वस्त राहतील.

       ब) पंढरपूर व औरंगाबाद या विभागातील कारभाराची देखरेख व तेथील संस्थेच्या वास्तूच्या रक्षणाकरिता तेथे ११ जणांची उपसमिती राहील. त्या ११ सदस्यामंध्ये मुख्य कार्यकारणीचे अध्यक्ष व सचिव व त्या विभागातील निर्वाचित सदस्य हे पदसिद्ध उपसमितीचे सदस्य असतील. व उपसामितीतील इतर सहा सदस्याची नेमणूक ही मुख्य कार्यकारणी करेल. सदर उपसमितीचे पदाधिकारी हे निर्वाचित सदस्या मधूनच असतील. (अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सचिव ),व उर्वरित पदाधिकारी हे त्या ११ सद्स्यामधून निवडण्यात येतील .

       क) विभागीय उपसमित्या या मुख्य कार्यकारिणीच्या नियंत्रणाखाली राहतील.व मुख्य कार्यकारिणी तर्फे घेतले जाणारे सर्व निर्णय उपसामित्यांना बंधनकारक असतील.उपसामित्यांना संस्थेच्या स्थावर मिळकतीबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार राहणार नाहीत .

       ड) विभागीय उपसमित्या मार्फत होणारे प्रत्येक आर्थिक व बँक व्यवहार हे उपसमितीचे अध्यश व मुख्य कार्यकारिणीचे सचिव यांच्या दोघांच्या संयुक्त सहीने होतील .

कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व त्यांचे कर्तव्य :

      अ) अध्यक्ष -
             १) सभा बोलविणे.
             २) सभेचे अध्यक्ष म्हणून संचालन करणे .
पूर्ण वाचा.

संपर्क

  • आमचा पत्ता

  •       **आळंदी**
  • देहूफाटा,आळंदी देवाची,
    तालुका-खेड,जिल्हा-पुणे.
    पुणे-412 105.
  •       **औरंगाबाद**
  • हरिराम नगर,
    बीड बायपास रोड,
    औरंगाबाद.
  •       **पंढरपूर**
  • सारडा,धर्मशाळेशेजारी,
    चंद्रभाग घाट,
    पंढरपूर.


  • Faceboook
  • Twitter
  • Google+



सभासद होणार असेल तर संपर्क करा.

ई-मेल: yellamreddy@gmail.com
               नाव  :   

 


 
भ्रमणध्वनी क्रमांक  :





 
पत्रव्यवहाराचा पत्ता  :  

 


 
              ई मेल  :   

 


 
     शैक्षणिक पात्रता  : 




 
             व्यवसाय  : 




 
            वय लिहा  :   

 


 
            संदेश लिहा  :   

 


 
 
                  

 

फक्त प्रशासकच हा अर्ज भरू शकतो.




सभासद क्रमांक  :


फोटो घ्या  ...

नाव  :


 

कायमचा पत्ता  :


 

पत्रव्यवहाराचा पत्ता  :


 

भ्रमणध्वनी क्रमांक  :


 

फॅक्स क्रमांक  :


 

ई मेल  :


 

जन्म दिनांक  :


 

लिंग  :


 

वय  :


 

वैवाहिक स्थिती :


 

शैक्षणिक पात्रता  :


 

व्यवसाय  :


 

साप्ताहिक सुट्टीचा दिवस  :


 

कुटुंबातील सदस्याची माहिती...


अ.क्र.

कुटुंबातील सदस्याची नाव

शिक्षण

भ्रमणध्वनी क्रमांक

रक्तगट

१.






२.







३.







४.







५.